या गावांमध्ये दुष्काळ जाहीर, पाहा तुमच्या गावाचे नाव.

मुंबई : नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमुळे बाधित होणाऱ्या आपतग्रस्तांना तातडीने मदत देणे शक्य व्हावे, यासाठी अशा प्रस्तावावर निर्णय घेण्याकरिता कायमस्वरूपी मंत्रिमंडळ उपसमिती संदर्भ क्र. २ येथील दि. १३ जून २०१८ च्या शासन निर्णयान्वये गठीत करण्यात आली आहे. सदर मंत्रीमंडळ उपसमितीस संदर्भाचीन क्र.२ येथील दि.५ डिसेंबर, २०१८ च्या शासन निर्णयान्वये सन २०१८ च्या दुष्काळी कालावधीसह भविष्यात दुष्काळ उद्भवल्यास त्या दुष्काळी कालावधीकरिता तातडीने उपाययोजना सुचविण्यासाठी/ सनियंत्रण ठेवण्यासाठी / निर्णय घेण्यासाठी पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. संदर्भ क्र. २ येथील दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ च्या शासन निर्णयानुसार या मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. दुष्काळ व्यवस्थापन संहिता, २०१६ मधील तरतुदी व निकष विचारात घेवून संदर्भ क्रमांक ३ येथील दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२३ च्या शासन निर्णयान्वये राज्यातील ४० तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त राज्यातील इतर तालुक्यातील महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत कमी पर्जन्यमान झाले असल्याचे आढळून आलं आहे. या मंत्रिमंडळ उपसमितीच्या दिनांक ९ नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये कमी पर्जन्यमान झालेल्या महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करून तेथे सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यास अनुसरून शासन आदेश निर्गमित करण्याची बाब विचाराधीन होती.

राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या ७५% पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान ७५० मि.मि. पेक्षा कमी झाले आहे अशा सोबतच्या परिशिष्ट-अ येथे नमूद केलेल्या एकूण ५०२५ महसुली मडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्यास शासनाने मंजूरी दिली आहे.


दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या गावांना पुढील सवलती देण्यात येणार आहेत.

◆ जमीन महसुलात सूट


◆ सहकारी कर्जाचे पुनर्गठन


◆ शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती..


◆ कृषी पंपाच्या चालू विजबिलात ३३.५% सूट.


◆ शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या परिक्षा शुल्कात माफी. 


◆ रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता.


◆ आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टॅकर्सचा वापर.


◆ टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतक-यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे.


दुष्काळ जाहीर झालेल्या गावांची यादी पाहण्यासाठी : येथे क्लिक करा.


लिंक एक


लिंक दोन


लिंक तीन

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

UPSC CMS Bharti 2025: UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2025 [705 जागा]

CISF Constable Tradesmen Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 जागांसाठी भरती

RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वे भरती 2025(मुदतवाढ)