विद्यापीठ व महाविद्यालयांच्या कोणत्याही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतलेला नाही.
#coronavirus चा वाढता प्रादुर्भाव पाहता दहावीचा भूगोलाचा पेपर व अकरावीची परीक्षा रद्द करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा निर्णय. मात्र, विद्यापीठ व महाविद्यालयांच्या कोणत्याही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतलेला नाही.
परीक्षा कधी, कशा आणि कोणत्या कालावधीमध्ये घ्यायच्या यासाठी कुलगुरूंची समिती स्थापन. या समितीचा अहवाल आणि राज्यातील #कोरोना च्या परिस्थितीचा एकत्रित विचार करणार. समितीच्या शिफारशी राज्यपालांकडे गेल्यानंतर त्यावर अंतिम निर्णय- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती