सामाजिक व धार्मिक तेढ, दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार- गृहमंत्री
समाज माध्यमांचा दुरुपयोग करून काही विघ्नसंतोषी लोकांकडून सामाजिक व धार्मिक तेढ, दुही निर्माण करण्याचा, समाजात अराजकता माजवण्याचा प्रयत्न. त्यांच्यावर महाराष्ट्र सायबरचे लक्ष. असे काही करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार गृहमंत्री अनिल देशमुख यांचा स्पष्ट इशारा.
#coronavirus च्या साथीमुळे असलेल्या #Lockdown दरम्यान सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ. अफवा व खोट्या बातम्या पेरुन भीती व द्वेष पसरविण्याच्या या प्रकारांवर महाराष्ट्र सायबर सेलने बारकाईने लक्ष ठेवून कारवाई करावी असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
पोलिसांनी १८३ गुन्हे नोंदविले. त्यात समाज माध्यमांतून द्वेष-भाष्याचे ८७ गुन्हे. यामुळे ३७ जणांना घेतले ताब्यात. ११४ जणांचा गुन्ह्यांमध्ये हात असल्याची खात्री पटली. सर्वाधिक केस (८८) व्हॉट्सॲपच्या गैरवापराच्या, फेसबुक (४९), टिक-टॉक ३ व ट्विटर २ केसेस असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
सायबर सेलकडून सर्व संबंधित समाज माध्यमांच्या प्लॅटफॉर्म्सना अशा पोस्ट्स काढून टाकायचे आदेश. यातील ३२ पोस्ट्स काढून टाकण्यात यश. बाकी पोस्टस काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू असल्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती.