राज्यातील लॉकडाऊन कायम; उद्धव ठाकरेंची मोठी घोेषणा
मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेला 21 दिवसांचा लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. कोरोनाची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात न आल्याने हा लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 14 एप्रिलनंतर महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम असेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.
पंतप्रधानांच्या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पहिल्यांदा बोलण्याची संधी दिली. त्यावेळी मी सर्व माहिती देताना शेवटी हेच सांगितलं आहे की देशात लॉकडाऊन वाढो अथवा नाही, पण मी महाराष्ट्रात 14 एप्रिलनंतर महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढवणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले.