3 मे पर्यंत लॉकडाउन, पंतप्रधानांच्या भाषणातील काही मुद्दे.
● खूप मोठे नुकसान आता पर्यंत आपण टाळले आहे. लोकांनी खूप कष्ट सहन करून हे सर्व लॉकडाऊन यशस्वी केले आहे याची मला जाणीव आहे
● इतर देशांच्या तुलनेत भारताने करोनाचं संक्रमण रोखण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केलेत
● सर्व देशवासियांना मी नमन करतो, बाबासाहेबाना आपण दाखवलेला संयम आणि सकल्पशक्ती हीच सर्वात मोठी श्रद्धांजली आहे. मी बाबासाहेबाना देखील नमन करतो.
● इतर देशांशी तुलना करण्याची वेळ नाही, पण आपली स्थिती जगातील महासत्तांच्या तुलनेत आटोक्यात आहे
● देशात अनेक भागात सण घरात साजरे केले जात आहेत हे खरंच कौतुकास्पद आहे
● संपूर्ण जगात कोरोनाचा हाहाकार माजलेला असताना आपण जे धैर्य दाखवले याचे जगभरात कौतुक होत आहे
● भारतात कोरोना केस सापडण्याआधीच आपण परदेश सीमा बंद केल्या, समस्या वाढण्याची वेळ पहिली नाही, समस्या दिसताच ती थांबवण्याचा निर्णय घेतला
● भारताने वेगवान निर्णय घेतले नसते, तर काय स्थिती असती, याची कल्पना करूनही अंगावर शहारे येतात, लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचा मोठा लाभ, याची मोठी आर्थिक किंमत मोजावी लागली, पण जीवापुढे याचं मोल नाही
● लॉकडाऊन चा कालावधी 3 मे पर्यंत वाढणार
● लॉकडाऊन च्या नियमात कोणत्याही प्रकारचा बदल नाही, आता जसे नियम आहेत तेच नियम सुरू राहणार
● सध्याची स्थिती पाहता 3 मे पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार, 3 मेपर्यंत घरातच राहावं लागेल
● पुढच्या काळात शिस्तीने वागणं आवश्यक आहे, अधिक सतर्कता बाळगायला हवी, कठोर पावलं उचलावी लागतील, नवीन हॉटस्पॉट तयार होऊ न देणं महत्त्वाचं
● 20 एप्रिलपर्यंत बारकाईने प्रत्येक राज्य, जिल्हे, शहर यांचं मूल्यांकन, जे क्षेत्र आपलं हॉटस्पॉट वाढू देणार नाहीत, तिथे काही आवश्यक गोष्टींना सूट किंवा सशर्त अनुमती देण्याचा विचार करू
● पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून हातावर पोट असलेल्या गरीब मजुरांसाठी विशेष प्रयत्न
● सरकार उद्या विस्तृत मार्गदर्शक तत्त्वे जरी करणार
● कोरोनाचे 10 हजार रुग्ण झाल्यावर 1500-1600 बेड्स असावे, असा जागतिक अनुभव, आपल्याकडे 2 लाख बेड्स आणि 600 कोविड रुग्णालये